Climate Change : 2050 पर्यंत जगासमोर भीषण संकट, वातावरणात होतील 'हे' बदल बघा सविस्तर... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Climate Change : 2050 पर्यंत जगासमोर भीषण संकट, वातावरणात होतील 'हे' बदल बघा सविस्तर...

दि. 08.06.2023

MEDIA VNI 

Climate Change : 2050 पर्यंत जगासमोर भीषण संकट, वातावरणात होतील 'हे' बदल बघा सविस्तर...

मीडिया वी.एन.आय : 

Climate Change : आपल्या आजूबाजूच्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. संपूर्ण जग भीषण पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. बहुतांश देशात पाण्याचे दुर्भिक्ष आहे.

यामुळे सगळ्या जगाला हवामान बदलाचे Climate Change  परिणाम भोगावे लागत आहेत. यामध्ये येणाऱ्या काळात आणखीन वाढ होण्याचा धोका आहे. यापूर्वीच अनेक शास्त्रज्ञांनी जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. हवामान बदलांमुळे हिमनग वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहेत. जर वातावरणातील प्रदूषण असेच वाढत राहिले, तर येणाऱ्या दिवसांत तापमान वाढ होणार आहे. या तापमान वाढीचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

पृथ्वीच्या तापमानात होईल वाढ :

हवामानातील वाढत्या तापमानामुळे तणाव आणि नवजात शिशूंचा जन्म वेळेआधी होण्याचे प्रमाण वाढेल. तसेच आपली विचार करण्याची क्षमता कमी होईल. 1850 पासून ते 1900 पर्यंतचा काळ औद्योगिक पूर्व जग म्हणून ओळखले जाते. 1850 पासून ते 2020 पर्यंत तापमानात सरासरी 1.1 डिग्री सेल्सियसची वाढ झाली आहे. खनिज तेलाच्या अतिवापरामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साई़डचे प्रमाण वाढले. ही गेल्या 2000 हजार वर्षातील सर्वाधिक तापमान वाढ आहे.

वाढत्या तापमानामुळे वाढतील समस्या :

'दैनिक भास्कर'च्या एका रिपोर्टनुसार, वाढत्या तापमानामुळे तणाव वाढेल. यामुळे हृदयविकाराशी संबंधित समस्या आणि स्ट्रोक्समध्येही वाढ होईल. प्रसुतीपूर्व जन्मदर आणि बाल मृत्यूदरांमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अतिवृष्टीच्या घटना वाढतील आणि दरवर्षी दीड लाख लोक मृत्यूमूखी पडतील. यामुळे जवळपास दीड कोटी लोकांवर परिणाम होईल.

पावसाच्या वेळापत्रकात होईल बदल

तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाच्या क्रियेत वाढ होईल. यामुळे पावसाचे प्रमाण वाढेल. काही परिसरात जास्त पाऊस, तर काही परिसरात कमी पाऊस पडू शकतो. यामुळे ओला आणि कोरडा दुष्काळ पडतो. 'ग्रीनपीस ईस्ट आशिया'च्या रिपोर्टनुसार, 2023 पर्यंत समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल. यामुळे सात आशियन शहरातील कमीत कमी दीड कोटी लोक आणि 1829 वर्गकिलोमीटरच्या जमिनीच्या भागावर परिणाम होईल. या रिपोर्टनुसार, 2030 पासून ते 2050 पर्यंत अनेक प्रकारच्या रोगांचा लोकांना संसर्ग होईल. यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.

समुद्र होईल आम्लधर्मीय :

हवेतील वाढलेले कार्बन डाय ऑक्साईड आणि ग्रीन हाऊस गॅसचे समुद्राच्या पाण्यात मिसळत आहे. यामुळे समुद्र आम्लधर्मीय होत आहे. यामुळे समुद्रातील अनेक सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->